कण्हेर धरणातील पाणी गढूळ
नागरिकांनी पाणी गाळून व उकळूनच वापरावे
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन
सातारा | प्रतिनिधी
शाहूपुरी (कण्हेर धरण उद्भव) नळपाणी पुरवठा योजनेतील सर्व ग्राहकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने महत्त्वाचे आवाहन केले आहे. मागील चार ते पाच दिवसांतील मुसळधार पावसामुळे कण्हेर धरणात मोठ्या प्रमाणात गाळमिश्रित व गढूळ पाण्याची आवक झाली आहे.
प्राधिकरणाकडून या पाण्यावर आवश्यक ती शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येत असली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी नळाद्वारे येणारे पाणी गाळून व उकळूनच पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सहकार्य करावे, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!