राज्याचे ग्रामविकासमंत्री
जयकुमार गोरे यांना पितृशोक
दहिवडी : राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील श्री. भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. भगवानराव गोरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच माण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
भगवानराव गोरे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव आज दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बोराटवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर बोराटवाडी (ता. माण, जि. सातारा) येथे दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!