डॉ. बाबासाहेबांचे विचार,कार्य पुढे नेणे, हेच खरे अभिवादन ठरेल : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


डॉ. बाबासाहेबांचे विचार, कार्य

पुढे नेणे हेच खरे अभिवादन ठरेल

: उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली 

मुंबई : "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्य घटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून त्यांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल," अशा शब्दात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्रद्धांजली वाहिली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 

या वेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (कार्यभार) डॉ. विलास आठवले, अवर सचिव श्री. विजय कोमटवार, उपसभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, संचालक वि. स. पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही गुलाबपुष्प अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.


Post a Comment

0 Comments